पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...

 *पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...*


*टप्पा १:- १९५०  ते १९७५*


*या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.* 

*सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३०  एकर जमिनीचे मालक...* 

*मोठे वाडे...*

*दांडगा रुबाब...* 

*निसर्गावर चालणारी शेती...*

*अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक,*

*मिलिटरी भरती,*

*पोलीस भरती झाले.*

*तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे.*

*अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले.*

*नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...*

*उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.*

*हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.*


*टप्पा २:- १९७५ ते १९९५* 


*देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला,*

*१९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.*

*शेतीची विभागणी सुरु झाली,*

*२० एकराचे मालक ५ एकरावर आले.*

*बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.*

*शेती आता भांडवलदाराची होऊ लागली.*

*विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या.*

*पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.*

*राजकारण गावागावात घुसलं.*

*पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या.*

*बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले.* 

*स्पर्धा वाढली.*

*आता नोकरी सोपी राहिली नाही.*


*हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला.*

*वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली.*

*२० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला,*

*पोरं बेकार फिरू लागली.*


*टप्पा ३:- १९९५ -२००९* 


*हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ.*

*परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले.*


*मोठे उद्योग यांनी काबीज केले.*

*हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदि उत्तरेतील लोकांनी काबीज केली.*

*सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली.*


*मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडणे, बोअर मारणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणे, भरतीला जाणे, पोराला हायस्कुल वर चिटकवणे ह्यातच गुंतलेला दिसला.*

*२० एकर जमीन वाटण्या होऊन,*

*मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते.*

*अजूनही पाटीलकी व  जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.*


*टप्पा ४:- २००९ ते २०२०* 


*ग्लोबलायझेशन झाले,* 

*जगाचे पैसे भारतात आले.*

*पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती  आल्या.*

*मग काय...?*

*जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली.*

*राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला.*

*जमीनदारी संपली, पोरं बेकार किंवा पुणे-मुंबईत ८-१० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.*

*आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही.*

*खरी, बिकट गरिबी सुरु झाली.*

*पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला.*

*बापाकडे लग्नाला पैसा नाही.*

*मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या.*

*गावचा जमीनदार हमाली करू लागला.*

*व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं ही वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.*


*टप्पा ५:- २०२० ते २०३०*


*इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल.*

*ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार.*

*नोकरी हा विषय संपला आहे.*

*नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.*

*उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल.*

*पैसा न कामविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही.*

*शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.*


*अजून वेळ गेली नाही.*

*शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा.*

*नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.*


*जो चूक करतो तो माणूस,*

*तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस,*

*जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस.*


*अजुन वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत हे पहाण्यासाठी.*


*आपल्या माणसाला साथ द्या,*

*आपल्या माणसाला मोठ करा.*

*आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा.*

*आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे.*


*(सत्य परिस्थितीवर आधारीत असलेला हा लेख सोशल मीडियावरून घेतलेला...)*

*मला आवडलेला आहे,*

*आपणासही नक्कीच आवडेल बघा आपल्या पुढच्या पिढ्या वाचवता आल्या तर छानच...*


*एक भयाण वास्तव...!*



Post a Comment

0 Comments