सरकारी कंत्राटदारांचे तब्बल ८६,००० कोटी रुपयांचे बिल थकल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कंत्राटदारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. 'कंत्राटदार म्हटलं की डोळ्यासमोर चैनीचं आयुष्य येतं, पण आज आम्हाला बँकेचं व्याज भरायलाही पैसे नाहीत', अशी परिस्थिती का निर्माण झाली? आमदारांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा आणि 'टक्केवारीच्या' खेळाचा यात काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
0 Comments